Saturday, December 1, 2018

पाण्यासाठीचा विजयी संघर्ष...

                    पाण्यासाठीचा विजयी संघर्ष...
वरील सर्व छायाचित्रे सदर वर्तमानपत्रांच्या ई-पेपरमधुन घेतले आहेत.

     यंदा सांगोल्यामध्ये पाऊस पडलाच नाही. दुष्काळाची दाहकता इतकी भयानक आहे की यंदा खरीप आणि रबी दोन्ही हंगाम १०० टक्के फेल गेले.डाळिंब,बोरी,पेरू,द्राक्षे अशी फळपिके घेऊन उत्पादनांचे विक्रम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची अवस्था पाहून फळबागा सोडून दील्या.ज्या शेतकऱ्यांनी धाडसाने पाणी पुरेल या आशेने बागांचे बहर धरले त्यांच्या बागांना नेमकं फळाच्या वाढीच्या काळात पाणी कमी पडू लागलं होत.पाण्याविना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता.टेंभू उपसा सिंचन योजनेतुन सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी देखील सांगोल्याला आजपर्यंत मिळत नव्हते.५० वर्षांपूर्वी १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीमधे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काढलेल्या नीरा उजवा कालव्याला अद्याप पर्यंत कधीच पाणी आले नव्हते ते यावर्षी ऑक्टोबर महिन्यामधे चाचणी घेण्याच्या निमित्ताने का होईना पण आले.त्या कालव्याची कामे सुरू असली तरी तालुक्याच्या हक्काचे पाणी यायला अजून किती दिवस लागतील हे सांगता येत नाही.टेंभू आणि म्हैसाळ योजनेच तालुक्याच्या हक्काचे पाणी आजपर्यंत शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनीच वापरले.अशा पार्श्वभूमीवर सांगोल्यातील मान नदीकाठावरच्या चिनके पासून मेथवडे पर्यंत कायम पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावातील तरुणांनी संघटित होऊन एक क्रुती समिती तयार केली.
२०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणी प्रश्न पेटणार होताच.आमदारकीचे सर्वच उमेदवार केवळ दुष्काळ आणि पाणी याच दोन मुद्द्यांवर एकमेकांवर गरळ ओकणार होतेच . वेगवेगळ्या कार्यक्रमांमधुन त्याची सुरुवात देखील झाली होती.पण तत्पूर्वी या १४ गावांतील जनतेने आंदोलनाची गुगली अशी टाकली की सर्वच नेते आणि त्यांच राजकारण बँकफुटवर गेलं आणि जनता फ्रंटफुटवर आली. 
     १)मान नदिवरचे १४ गावातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हक्काच्या टेंभू योजनेच्या पाण्यातून भरून द्यावेत.
२)माण नदिला कालव्याचा दर्जा द्यावा.
३)नीरा उजवा कालव्याची कामे लवकरात लवकर पुर्ण करुन हक्काचे पाणी तालुक्याला मिळावे या आणि अशा आणखी काही मागण्या घेऊन १४ गावच्या जनतेने क्रुती समितीच्या नेतृत्वाखाली सांगोला तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चाचे फलित म्हणून टेंभू योजनेच्या पाण्याने बंधारे भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ला पाणी माण नदीपात्रात सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते.पण १६ तारीख उलटून गेली तरी पाणी सोडण्याबाबतीत कुठलीच क्रुती न झाल्याने.१४ गावांतील शेतकऱ्यांनी क्रुती समितीच्या नेतृत्वाखाली जनावरांसह तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलनाला १७ नोव्हेंबरपासुन सुरुवात केली.सोबतच दिपक पवार व दत्ता टापरे या युवकांनी पाणी मेथवडे बंधाऱ्यांमधे पोहोचत नाही तोवर बेमुदत उपोषनाचा निर्णय घेतला.या आंदोनस्थळी तालुक्यातील सर्वच नेतेमंडळीनी भेटी दिल्या पण पाणी येण्यासाठी  त्यांच्याकडून तातडीने जे प्रयत्न होणे गरजेचे होते ते झाले नाहीत.खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी जबाबदारी ओळखुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.मंत्री विजयबापु शिवतारे आणि क्रुती समितीच्या झालेल्या बैठकीत तोडगा काढण्याचे प्रयत्न देखील झाले.उपोषणकर्त्यांच्या तब्येती बिघडल्या.२४० तास म्हणजे १० दिवस उपोषण केल्यानंतर,तळपत्या उनाची आणि रात्रीच्या थंडीची कसलीही तमा न करता शेतकरी आणि जनावरानी तहसिल कार्यालयावर ठीय्या मांडल्यानंतर आणि या आंदोलनात उष्माघाताने एका म्हशीचा बळी गेल्यानंतर या आंदोलनाला यश आले.२७ नोव्हेंबरला टेंभू योजनेचे पाणी मान नदीच्या दिशेने मार्गस्थ झाले.३० नोव्हेंबर ला अनेक अडथळे पार करत हे पाणी सांगोल्यातील चिणके गावामध्ये दाखल झाले.प्रचंड मोठा संघर्ष करून मिळालेल्या या पाण्याला पाहण्यासाठी चिणके येथे क्रुति समितीसह मोठ्या संख्येने लोक आले होते.एका दुष्काळी तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात पाण्यासाठी झालेले हे आजपर्यंतचे सर्वात प्रभावी, आक्रमक आणि यशस्वी आंदोलन आहे.क्रुती समितीचे नियोजन,शेवटपर्यंत मागण्यांवर ठाम राहण्याचा संयम,एकी,जनावरांसह अद्यापपर्यंत तेथेच बसुन असलेल्या शेतकऱ्यांची सहनशीलता, उपोषणकर्त्यांचा धीर,आणि प्रसारमाध्यमांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत दिलेली साथ,अनेकांनी जनावरांसाठी केलेली चारा आणि पाण्याची सोय सगळच कौतुकास्पद होतं.हा संघर्ष सुरू झाल्यापासून त्याला यश मिळेपर्यंतचा या आंदोलनाचा प्रवास थक्क करणारा वाटतो.एकप्रकारे यंदाच्या भीषण दुष्काळनेच शेतकऱ्यांना लढायला बळ दिले अस म्हणायला हरकत नाही. आणि लढण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकीच्या वज्रमुठीत सामावून घेण्याची आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याची किमया साधली क्रुति समितीच्या तरुण ,तडफदार युवकांनी. सर्वांनी या आंदोलनातील आपलीआपली जबाबदारी ओळखुन अतिशय चोखपणे ती निभावल्यानेच या पक्षविरहीत आंदोलनाला यश मिळाले.या आंदोलनातुन संघर्ष केल्याशिवाय आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माणगुटिवर बसल्याशिवाय आपली कामे होत नसतात हि अतिशय मोलाची शिकवनदेखील तालुक्याला मिळाली.
     एकीकडे २३ते २६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नागपुरमध्ये मध्य भारतातील सर्वात मोठे क्रुषी प्रदर्शन 'अँग्रो व्हिजन' नितीन गडकरीच्या नेतृत्वाखाली पार पडत होते.उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ, केंद्रीय क्रुषीमंत्री राधामोहन सिंह,चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'दुष्काळाशी झगडत देखील सांगोला सर्वच प्रकारच्या फळबागांचा  हॉर्टिकल्चरल झोन होत असल्याची माहिती दिली.' शेततळ्यांच्या माध्यामातुन तालुक्याने केलेल्या सुक्ष्म सिंचन क्रांतीचे कौतुक राज्यभरात होत असते.पण त्याच सांगोल्यातील शेतकऱ्यांना हि फळशेती टिकविण्यासाठी एवढा संघर्ष करावा रागत असेल तोही हक्काच्या पाण्यासाठी तर हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.पण या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत शासण आणि प्रशासणाने लक्षात ठेवावे की सांगोल्यातला तरुण शेतकरी खडबडून जागा झालाय.आणि तो आता यापुढे त्यांच्या हक्काचे पाणी कधीच सोडणार नाही.हक्काचे पाणी तो मिळवणारच.सुदैवाने यापुढील काळात पाऊस वेळेत पडावा आणि निसर्गाचा सर्वांगीण समतोल राहावा जेणेकरून कोरडा दुष्काळ पडु नये.शेवटी १४ गावांची क्रुती समिती,समितीतील सर्व तरुण,आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन आणि आगामी काळासाठी हार्दिक शुभेच्छा.आपली शेती सम्रुद्ध व्हावी.
@अमित जालिंदर शिंदे

3 comments:

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...