Friday, November 16, 2018

ह्या दुष्काळाच नक्की करायचं तरी काय??

           ह्या दुष्काळाच नक्की करायचं तरी काय??
     आज अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे घनदाट ढग गडगडत आहेत. शेतीचा विचार दुरचं,प्यायच्या पाण्याची अवस्थादेखील भयंकर बिकट झाली आहे.मराठवाड्याला वरदायिनी असलेलं जायकवाडी रिकामच राहीलं.ते नगर आणि नाशिकमधल्या पाण्याने भरून घेण्यावरुन अगदी न्यायालयातुन निर्णय घ्यावा लागला.मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की पावसाचे प्रमाण प्रत्येक वर्षी कमीकमीच होतयं.यावर्षी तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस कसलाच पडला नाही. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दुष्काळाची काळीभोर छाया आहे.दुष्काळमुक्तीसाठी जलसंवर्धन गरजेचे आहे हे एक सत्य आहेच पण पाऊसच पडणार नसेल तर कुठल्या पाण्याचे जलसंवर्धन आपण करणार आहोत??याच कारणामुळे कदाचित जलयुक्त शिवार आणि वॉटर कप सारख्या चळवळी होऊनदेखील भुजल पातळीत १ मीटरने घट झालीये.सांगोला-आटपाडी सारख्या तालुक्यांमध्ये १५०० फुट खोल बोअरवेल घेतले तरी नुसता धुरळाच उडताना पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस माणूस निसर्गावर अतिक्रमण करू पाहतोय. आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर झाडांच्या कत्तली होत आहेत. वनांच्या घटत्या टक्केवारीमुळेच हवेतील कार्बन डायऑक्साईड वाढतोय. आणि, जागतिक तापमानवाढीसारख्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागतोय.ढगांतील सुक्ष्म जलकणांचे मोठ्या जलबिंदुत रुपांतर झाल्यानंतर झाल्यानंतर हे जलबिंदु हवेपेक्षा जड होऊन पाऊस पडतो.यासाठी वातावरणात गारवा असणे महत्त्वाचे असते.झाडे तोडली गेल्यामुळे आम्ही मात्र जागतिक तापमानवाढीचा सामना करतोय. कसा पडणार मग पाऊस??
सरकार दरवर्षी कोट्यावधी व्रुक्षलागवडीचा कार्यक्रम महिनाभर धुमधडाक्यात करते पण गरज आहे ती लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची आणि त्यासाठी वर्षभर कोट्यावधी व्रुक्षसंगोपन मोहीम राबविण्याची.'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही आपल्या सर्वच सरकारी योजनांची ओळख.असो,सरकार काय करतं यापेक्षा आपण सुजाण नागरिक काय करतो हे अधिक महत्त्वाचे आहे.आपण आपली शेती सम्रुद्ध ठेवण्यासाठी ,पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी स्वतःच आपल्या स्वतःच्या शेताच्या बांधावर,परसबागेमध्ये व्रुक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणेही गरजेचे आहे.अन्यथा पाण्याविना विनाश फार काही दूर नाही.
     पाण्याच्या तुट निर्माण होण्याला आणि भुजलपातळी खोलावण्याला वाढलेली लोकसंख्या हे देखील महत्त्वाचे कारण आहे.लोकसंख्या वाढली.लोकांच्या गरजा वाढल्या .गरजा भागविण्यासाठी परत व्रुक्षतोड झाली. पाऊस खूप कमी पडू लागला.१९४७ ला भारताची ३० कोटींच्या घरात असलेली लोकसंख्या चारपटीने वाढली तर पावसाचे प्रमाण चारपटीने कमी झाले. पाण्याची गरज भागविण्यासाठी विहिरी,आड आणि शेकडो फुटांच्या बोअरवेल खणल्या गेल्या. वीजेवरच्या इंजिनांच्या साहाय्याने भुगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत गेला.तुलनेत पाऊस कमीच पडू लागला.त्यामुळे आगामी काळात आपल्या जोशील्या तरुण भारताला व्रुक्षलागवड,व्रुक्षसंगोपन आणि जलसंवर्धनाबरोबरच लोकसंख्या नियंत्रण देखील ठेवावे लागणार आहे.आणि या गोष्टींसाठी शासकीय मोहीमा आणि योजनांपेक्षा लोकचळवळ आणि जाग्रुती होण्याची खरी गरज आहे.
     चला तर मग येणाऱ्या दुष्काळाचा साहसाने सामना करताना निर्धार करुया व्रुक्षलागवडीचा,त्यांच्या संगोपनाचा,जलसंवर्धनाचा आणि लोकसंख्या नियंत्रणाचादेखील...
@अमित जालिंदर शिंदे.

⏺️सांगोल्यातील यंदाच्या दुष्काळाची दाहकता दाखवणारी काही छायाचित्रे
गरीबांची गाय असलेलल्यां शेळ्यांना शेतातून चारा आणि गवत उपलब्ध होत नसल्याने बाभळीच्या शेंगा आणि फांद्या तोडून घालताना शेळीपालक.
-----------------------------------------------------------------------------------------------
पावसाअभावी यंदा ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या पेरण्या झाल्याच नाहीत. पण सांगोल्याच्या काही भागात पावसाच्या आशेने धाडसाने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी पाण्याअभावी सुकून चालली आहे. यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम कोरडेच गेले.
-----------------------------------------------------------------------------------------------
सांगोल्यातील ५० वर्षापूर्वी खोदलेल्या पण अद्याप कोरड्याच असलेल्या नीरा उजवा कालव्याच्या काठावर शेळ्या चरायला सोडल्या जातात.
-----------------------------------------------------------------------------------------------
कधी नव्हे ते जनावरांच्या चाऱ्यासाठी कारखाण्यांच्या एफ.आर.पी.पेक्षा महाग दराने ऊस खरेदी करताना पशुपालक. हे चित्र असेच राहिले आणि शासणाने चाऱ्याची व्यवस्था केली नाही तर जनावरे मोकाट सोडावी लागतील

Friday, November 2, 2018

राजकारण थांबवा

दै.लोकसत्ता, दि-०२/११/१८,शुक्रवार लोकमानस मध्ये प्रसिद्ध झालेला विचार
लिंक-http://epaper.loksatta.com/c/33635871

न्यूझीलंड,कोरोना,नागरीक आणि जेसिंडा आर्डर्न... न्यूझीलंड देशाचा राष्ट्रध्वज      न्यूझीलंड, प्रशांत महासागराने चौफेर वेढलेला एक बे...